शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
3
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
4
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
5
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
6
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
7
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
8
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
9
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
10
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
11
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
12
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
13
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
14
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
15
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
16
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
17
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
18
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
19
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
20
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 

शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी पेन्शन कायदा करा--‘माकप’ची मागणी -सांगलीतील राज्य अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:52 IST

सांगली : शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यासाठी केंद्राकडून कायदा करण्यात यावा, या मागणीसह इतर सतरा ठराव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या;

सांगली : शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यासाठी केंद्राकडून कायदा करण्यात यावा, या मागणीसह इतर सतरा ठराव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामध्ये करण्यात आले. शनिवारी या अधिवेशनाचा समारोप झाला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन तीन दिवस सांगलीत मराठा समाज भवनमध्ये झाले. या अधिवेशनाची सांगता शनिवारी झाली. अधिवेशनात माजी खासदार सीताराम येचुरी, महेंद्रसिंग, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, नरसय्या आडम, डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे अजित नवले, मरियम ढवळे, नीलोत्पल बसू, सुभाष पाटील, रमेश सहस्त्रबुद्धे, नामदेव गावडे, उमेश देशमुख आदी उपस्थित होते. प्रा. व्ही. वाय. पाटील अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते.

या अधिवेशनामध्ये सतरा ठराव करण्यात आले. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना व महामंडळे अंमलात आणा, अंपग, निराधार शेतकरी, शेतमजूर आदींना दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन द्या, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कायदा करावा, अशा मागणीचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा मागणीचाही ठराव झाला. शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा, गारपीट व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई द्या, जमीन अधिग्रहण विरोधात संघर्ष करा, कोरेगाव-भीमा येथील जातीयवादी हल्ल्यातील मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे या सूत्रधारांना त्वरित अटक करा, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे सर्वांसाठी आरोग्याचा अधिकार द्या, कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा उभा करा, योजना कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवा, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला प्रतिबंद करा, नोकर भरतीवर घातलेली बंदी त्वरित उठवा, शेतमजुरांसह सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यास केंद्रीय कायदा करा, अल्पसंख्याक समाजांवरील वाढते हल्ले त्वरित रोखा, न्यायमूर्ती लोयांच्या संशास्पद मृत्यूची चौकशी करा या मागण्यांसह असंघटित कामगार वर्गामध्ये पक्षाचा राजकीय प्रभाव मजबूत करणे, असे ठराव करण्यात आले.

पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक, कमिटीचा अहवाल, नवीन राज्य नियंत्रण आयोगाची निवड आदी कार्यक्रम होऊन अधिवेशनाचा समारोप झाला.गरीब, कष्टकऱ्यांचे शोषण : येचुरीखासदार येचुरी यांनी, देशातील काही भांडवलदार भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी पैसा पुरवितात, त्या मोबदल्यात भाजप सत्तेत आल्यावर भांडवलदारांची सर्वच स्तरावरून दलाली करीत असल्याचा आरोप केला. पनामा पेपरमध्ये पंतप्रधानांचे नाव आहे. त्यामध्ये नाव आल्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाच्या अध्यक्षालासुध्दा राजीनामा द्यावा लागला, मात्र भारतात या प्रकरणाची साधी चौकशीसुध्दा झाली नाही. देशात सध्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक हल्ले बहुरूपी सरकारकडून सुरू आहेत. यामुळे देशातील सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. देशात गरीब, कष्टकºयांचे शोषण सुरू आहे. देशातील ७३ टक्के संपत्ती एक टक्के भांडवलदारांकडे गेली आहे, असा सूर व्यक्त झाला. शेतकरी व कष्टकºयांना केंद्रस्थानी ठेवून या अधिवेशनामध्ये ठराव करण्यात आले.पानसरे, दाभोलकरांच्या खुन्यांना अटक करा!कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण झाली, तरीही यंत्रणेच्या हाताला काहीच कसे लागत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या केसबाबत न्यायालयाने अनेकवेळा ताशेरे ओढले; मात्र तरीदेखील यंत्रणा कोणत्या तरी दबावाला बळी पडत आहे. अधिवेशनामध्ये कॉ. पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांना व सूत्रधारांना अटक करून शिक्षा करावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.कोरेगाव-भीमा येथील जातीयवादी हल्ल्याचा निषेध करुन याप्रकरणी मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कायदेशीर अटक करून चौकशी करा. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरे आणि खोटे ठरवतील. सरकारनेच त्यांना निर्दोष ठरविण्याची गरज नाही, अशी टीका करुन खा. येचुरी यांनी भिडे व एकबोटे यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीचा ठराव केला.