शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी पेन्शन कायदा करा--‘माकप’ची मागणी -सांगलीतील राज्य अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:52 IST

सांगली : शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यासाठी केंद्राकडून कायदा करण्यात यावा, या मागणीसह इतर सतरा ठराव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या;

सांगली : शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यासाठी केंद्राकडून कायदा करण्यात यावा, या मागणीसह इतर सतरा ठराव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामध्ये करण्यात आले. शनिवारी या अधिवेशनाचा समारोप झाला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन तीन दिवस सांगलीत मराठा समाज भवनमध्ये झाले. या अधिवेशनाची सांगता शनिवारी झाली. अधिवेशनात माजी खासदार सीताराम येचुरी, महेंद्रसिंग, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, नरसय्या आडम, डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे अजित नवले, मरियम ढवळे, नीलोत्पल बसू, सुभाष पाटील, रमेश सहस्त्रबुद्धे, नामदेव गावडे, उमेश देशमुख आदी उपस्थित होते. प्रा. व्ही. वाय. पाटील अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते.

या अधिवेशनामध्ये सतरा ठराव करण्यात आले. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना व महामंडळे अंमलात आणा, अंपग, निराधार शेतकरी, शेतमजूर आदींना दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन द्या, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कायदा करावा, अशा मागणीचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा मागणीचाही ठराव झाला. शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा, गारपीट व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई द्या, जमीन अधिग्रहण विरोधात संघर्ष करा, कोरेगाव-भीमा येथील जातीयवादी हल्ल्यातील मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे या सूत्रधारांना त्वरित अटक करा, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे सर्वांसाठी आरोग्याचा अधिकार द्या, कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासाठी लढा उभा करा, योजना कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवा, महिलांवरील वाढत्या अत्याचाराला प्रतिबंद करा, नोकर भरतीवर घातलेली बंदी त्वरित उठवा, शेतमजुरांसह सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन, पेन्शन व अन्य सुविधा देण्यास केंद्रीय कायदा करा, अल्पसंख्याक समाजांवरील वाढते हल्ले त्वरित रोखा, न्यायमूर्ती लोयांच्या संशास्पद मृत्यूची चौकशी करा या मागण्यांसह असंघटित कामगार वर्गामध्ये पक्षाचा राजकीय प्रभाव मजबूत करणे, असे ठराव करण्यात आले.

पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक, कमिटीचा अहवाल, नवीन राज्य नियंत्रण आयोगाची निवड आदी कार्यक्रम होऊन अधिवेशनाचा समारोप झाला.गरीब, कष्टकऱ्यांचे शोषण : येचुरीखासदार येचुरी यांनी, देशातील काही भांडवलदार भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी पैसा पुरवितात, त्या मोबदल्यात भाजप सत्तेत आल्यावर भांडवलदारांची सर्वच स्तरावरून दलाली करीत असल्याचा आरोप केला. पनामा पेपरमध्ये पंतप्रधानांचे नाव आहे. त्यामध्ये नाव आल्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाच्या अध्यक्षालासुध्दा राजीनामा द्यावा लागला, मात्र भारतात या प्रकरणाची साधी चौकशीसुध्दा झाली नाही. देशात सध्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक हल्ले बहुरूपी सरकारकडून सुरू आहेत. यामुळे देशातील सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. देशात गरीब, कष्टकºयांचे शोषण सुरू आहे. देशातील ७३ टक्के संपत्ती एक टक्के भांडवलदारांकडे गेली आहे, असा सूर व्यक्त झाला. शेतकरी व कष्टकºयांना केंद्रस्थानी ठेवून या अधिवेशनामध्ये ठराव करण्यात आले.पानसरे, दाभोलकरांच्या खुन्यांना अटक करा!कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण झाली, तरीही यंत्रणेच्या हाताला काहीच कसे लागत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या केसबाबत न्यायालयाने अनेकवेळा ताशेरे ओढले; मात्र तरीदेखील यंत्रणा कोणत्या तरी दबावाला बळी पडत आहे. अधिवेशनामध्ये कॉ. पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या खुन्यांना व सूत्रधारांना अटक करून शिक्षा करावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.कोरेगाव-भीमा येथील जातीयवादी हल्ल्याचा निषेध करुन याप्रकरणी मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कायदेशीर अटक करून चौकशी करा. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरे आणि खोटे ठरवतील. सरकारनेच त्यांना निर्दोष ठरविण्याची गरज नाही, अशी टीका करुन खा. येचुरी यांनी भिडे व एकबोटे यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीचा ठराव केला.